
Pahalgam Terror Attack । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेला असून, केंद्र सरकारने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यानंतर सरकारने एकामागोमाग एक कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
Pahalgam Terror Attack । पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये तातडीची बैठक; सैन्याला सतर्कतेचा आदेश
या हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अनंतनाग पोलिसांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे की, या दहशतवाद्यांविषयी खात्रीशीर माहिती देणाऱ्याला थेट २० लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, अशी ग्वाही देखील पोलिसांनी दिली आहे.
Diplomatic Strike l भारताची पाकिस्तानवर कडक कारवाई; घेतले पाच मोठे निर्णय
या संदर्भात नागरिकांना खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे:
एसएसपी अनंतनाग – ९५९६७७७६६६
पीसीआर अनंतनाग – ९६९६७७७६६९
ईमेल – dpoanantnag-jk@nic.in
दरम्यान, केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधातही कठोर निर्णय घेतले आहेत. हल्ल्यानंतर लगेचच सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला असून, अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यासोबतच भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत आणि नवीन पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
Politics News । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक
गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, देशात दहशतवादाला कोणतीही जागा दिली जाणार नाही. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, हे या निर्णयांवरून स्पष्ट होतं. संपूर्ण देशात या हल्ल्याविरोधात संताप व्यक्त केला जात असून, नागरिक सरकारच्या या ठोस भूमिकेचं स्वागत करत आहेत.