
Diplomatic Strike l जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ठोस पावलं उचलली आहेत. 28 निरपराध नागरिकांच्या मृत्यूनंतर भारताने केवळ निषेध न करता थेट कृतीचा मार्ग स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा समितीच्या तातडीच्या बैठकीत या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. भारताने एकूण पाच मोठे निर्णय घेतले असून हे निर्णय पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर मोठा परिणाम करू शकतात.
Politics News । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक
पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. गेल्या सहा दशकांपासून चालू असलेल्या या करारामुळे पाकिस्तानच्या शेतीला भारतातून पाणी मिळत होतं. आता हे पाणी थांबवल्याने पाकिस्तानमध्ये शेती आणि वीज निर्मितीवर गंभीर परिणाम होणार आहेत.
दुसरं मोठं पाऊल म्हणजे अटारी-वाघा बॉर्डरवरील पोस्ट बंद करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांतील लहान व्यापाऱ्यांमधील दैनंदिन व्यापार ठप्प होणार आहे.
Pahalgam Terror Attack । पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये तातडीची बैठक; सैन्याला सतर्कतेचा आदेश
तिसऱ्या निर्णयामध्ये भारताने पाक नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली आहे. यासोबतच भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांतील वैयक्तिक आणि मानवी संबंधही तुटतील.
चौथा निर्णय म्हणजे लष्करी सल्लागारांना देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील लष्कर, नौदल आणि हवाई दल अधिकारी भारतातून बाहेर जातील, आणि त्याचप्रमाणे भारताचे अधिकारी पाकिस्तानमधून परततील.
Cashless Treatment l अपघातग्रस्त रुग्णांसाठी राज्य सरकारकडून दिलासा – कॅशलेस उपचार योजनेची घोषणा
या सर्व निर्णयांमुळे भारताने पाकिस्तानवर राजनैतिक, आर्थिक आणि धोरणात्मक दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता पाकिस्तान पुढे काय भूमिका घेतो, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.