Manoj Jarange Protest । ब्रेकिंग! ‘या’ तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा १० तास राहणार बंद; जालन्यातील बससेवाही बंद

Jalna News

Manoj Jarange Protest । मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा बेत रद्द केला आहे. सध्या ते आपल्या गावी परतले आहेत. त्यांनी सोमवारी (२६ फेब्रुवारी) सांगितले की, सध्या आम्ही कायद्याचा आदर करू. मराठ्यांनीही राज्यात शांतता राखावी आणि कायदा हातात घेऊ नये. मनोज जरांगे यांनी सर्व मराठा बांधवांना घरी जाण्यास सांगितले.

Maratha Reservation । खळबळजनक! मराठा आंदोलनामागे शरद पवारांचा हात; कोणी केला गंभीर आरोप?

आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. गावात जाऊन उपचार करून घेतील आणि तेथेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी अंबड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांनी राज्य परिवहन बस पेटवून दिली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील सूचना मिळेपर्यंत जालन्यातील बससेवा बंद करण्यात आली आहे.

Ajit Pawar । भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी का केली? 9 महिन्यांनंतर अजित पवार यांनी सांगितलं खरं कारणं

कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील आदेशापर्यंत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रचंड गर्दीमुळे धुळे-मुंबई महामार्गासह परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता जालना प्रशासनाने व्यक्त केली आहे. संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. 10 तास इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

Ajit Pawar । ‘अपघातानेच मी राजकारणात…’, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Spread the love