Operation Sindoor । ऑपरेशन सिंदूर: भारताचे पाकिस्तानला प्रतिउत्तर, मध्यरात्री 9 ठिकाणी हल्ला; दहशतवाद्यांचा खात्मा

Operation Sindoor

Operation Sindoor । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला आता भारताने घेतला आहे. मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ या गुप्त कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळांवर जबरदस्त हवाई हल्ले केले आहेत. ही कारवाई रात्री 1 ते 1.30 दरम्यान पार पडली.

Hsc Result । मोठी बातमी! बारावीचा निकाल जाहीर; ‘या’ विभागाने मारली बाजी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकूण 9 ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. हल्ल्याचा उद्देश फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे हा होता. यामध्ये पाकिस्तानमधील बहावलपूर, कोटली, मुजफ्फराबाद, आणि मीरपूर या ठिकाणी दहशतवाद्यांची छुपी ठिकाणं निशाण्यावर घेतली गेली.

विशेष म्हणजे या कारवाईत जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या अनेक टॉप कमांडर्सचा खात्मा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. फक्त बहावलपूरमध्येच 50 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या गोटात मोठा धसका बसला असून पाकिस्तानमधील लष्करी यंत्रणा हादरली आहे.

Boat Accident | धक्कादायक! १६ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली; घडलं भयानक

भारतीय लष्कराने या मोहिमेत आधुनिक ड्रोन, सर्जिकल स्ट्राइक फोर्स आणि रडार-टारगेटिंग प्रणालींचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्ल्याआधी या कारवाईची कोणतीही पूर्वसूचना न देता, अचानक हल्ला करून भारताने दहशतवाद्यांना मोठा धक्का दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताने शांततेसाठी घेतलेलं निर्णायक पाऊल मानले जात असून, या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे अनेक गट उध्वस्त झाले आहेत.

Raosaheb Danve Accident | ब्रेकिंग न्यूज! लोणावळ्यात रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात

Spread the love