Hsc Result । मोठी बातमी! बारावीचा निकाल जाहीर; ‘या’ विभागाने मारली बाजी

Hsc Result

Hsc Result । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. सर्वच विभागांनी चांगली कामगिरी केली असली, तरी कोकण विभागाने सर्वाधिक निकालासह पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यभरातून जवळपास १४.८५ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १३.०२ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत झाली होती. यंदा वेळेत पेपर तपासणी पूर्ण झाल्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर झाला आहे.

Boat Accident | धक्कादायक! १६ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली; घडलं भयानक

कोकण विभागाने ९६.७४ टक्के उत्तीर्णतेसह राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. त्याच्यामागे कोल्हापूर विभाग ९३.६४ टक्के निकालासह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती आणि इतर विभागांनीही ९० टक्क्यांपेक्षा अधिक निकाल दिला आहे. मात्र लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच ८९.४६ टक्के लागला आहे.

Pahalgam Terror Attack । पहलगाम हल्ल्याचा निषेध; दहशतवाद्यांची माहिती दिल्यास २० लाखांचं बक्षीस

गुणांनुसार विद्यार्थ्यांची वर्गवारी पाहता, यंदा ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १.४९ लाखांहून अधिक आहे. प्रथम श्रेणीत (६० टक्क्यांपेक्षा अधिक) ४.०७ लाख विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ५.८० लाख, तर तृतीय श्रेणीत १.६४ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल यंदाही मुलांपेक्षा अधिक राहिला आहे. सरासरी टक्केवारी आणि गुणवत्ता यादीतही मुलींनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुलींनी शिक्षणात आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

Spread the love