Manoj Jarange Patil । मुंबईला जाण्याआधी मनोज जरांगे पाटील ढसाढसा रडले; नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । काहीही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज अंतरवाली सराटीतून मुंबईकडे मोर्चा निघणार आहे. मोर्चाला सुरुवात होण्याआधीच अनेक मराठा बांधवांनी आंतरवाली सराटी या गावात मोठी गर्दी केली आहे . दरम्यान यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Ayodhya Ram Mandir । राज्य सरकारचा मोठा निर्णय! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर

माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आता मागे हटायचं नाही काहीही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. शेकडो माता माऊलींच्या कपाळाला कुंकू राहिले नाही. सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं? आता या सरकारला नीट केल्याशिवाय मराठ्यांना शांत बसून चालणार नाही. असे देखील मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत.

Sharad Pawar । रोहित पवारांना ईडीची नोटीस येताच शरद पवार यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले; ‘राज्यात लवकरच ईडी..

मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून आपण मुंबईला जाणार आहोत. त्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले. त्याचबरोबर मी असेल नसेल विचार जागे ठेवा. २६ तारखेला घराघरातील मराठा समाजाने मुंबईला यावं असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Kishori Pednekar । बिग ब्रेकिंग! किशोरी पेडणेकर यांनाही ईडीचं समन्स, नेमकं कारण काय?

Spread the love