
Havaman Andaj । पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारली आहे. भर पावसाळ्यात पाऊसच गायब झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Rain Update) अनेक भागातील शेतकऱ्यांना तर पिके कशी जगवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. (IMD Weather Forecast)
पावसाला पोषक अशी स्थिती तयार झाली नसल्याने राज्यातील पाऊस लांबणीवर पडला आहे, परंतु या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात होणार आहे. पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र, दक्षिण द्वीपकल्प, कोकण, गोवासह मध्य भारतातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधर पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (IMD Alert)
South Africa Fire | सर्वात मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेमध्ये अग्रितांडव, अनेक जणांचा मृत्यू
किती पडेल पाऊस?
यावर्षी राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यातच राज्यातील सर्वच भागात पाऊस अपेक्षेप्रमाणे पडला नाही. परंतु सप्टेंबर महिन्यात ९१ ते १०९ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाने पुन्हा हजेरी लावली तर शेतकऱ्यांवरचे संकट टळू शकते. (IMD Update)
धरणात मुबलक पाणीसाठा
दरम्यान, पुणे शहरात मागील महिन्यात झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.