Site icon e लोकहित | Marathi News

Supriya Sule : राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली मोठी मागणी

Supriya Sule made a big demand to the government to declare drought in the state and give relief to the farmers

Supriya Sule : राज्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत. जर पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. आता सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.

Maharastra Rain । शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! पुढील पाच दिवस पाऊस नाही, काय आहे हवामान विभागाचा अंदाज? जाणून घ्या…

पहा सुप्रिया सुळे यांचे ट्विट

महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दि. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. हि परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. असं त्या म्हणाल्या आहेत.

VIDEO : मोठी दुर्घटना! अचानक अनेक इमारती कोसळल्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे; व्हिडिओ पाहून बसेल धक्का

त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी. असं देखील सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे (Supriya Sule Tweet) त्यामुळे आता याबाबत सरकार काही निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Government Contractor । सरकारी कंत्राटदार व्हायचंय? जाणून घ्या परवाना प्रक्रिया आणि अर्ज पद्धत

Spread the love
Exit mobile version