Bhushi Dam Tragedy । लोणावळ्यातील हृदयद्रावक अपघातावर मंत्री अनिल पाटील यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Anil Patil

Bhushi Dam Tragedy । लोणावळा येथील भुशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण पाण्यात वाहून गेले. या अपघातात चार जण बुडाले, तर एकाचा शोध सुरू आहे. यावेळी जोरदार प्रवाहात 10 जण वाहून गेले. त्यातील पाच जण पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. लोणावळ्यातील दुर्घटनेवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde । मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा; म्हणाले…

काय म्हणाले मदत व पुनर्वसन मंत्री?

वृत्तानुसार अनिल पाटील यांनी सांगितले की, ही घटना लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात घडली आहे. हडपसर येथील लियाकत अन्सारी आणि युनूस खान आणि त्यांचे 17 ते 18 जणांचे कुटुंब लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुशी डॅममागील दुर्गम भागात असलेल्या धबधब्यावर पावसासाठी गेले होते. पावसामुळे पाण्याचा वेग अचानक वाढल्याने त्यांच्या कुटुंबातील एकूण 10 जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले.

India Post Recruitment 2024 । दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसमध्ये 35 हजार पदांसाठी भरती

पाटील पुढे म्हणाले की, त्यातील पाच जण पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र उर्वरित पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. चार जण बुडाले तर एक बेपत्ता आहे. मुख्य सचिव राज्यातील सर्व ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधतील. आम्ही निषिद्ध ठिकाणी ते पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Lonavala News । भुशी डॅमवर एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Spread the love