
Uddhav Thackeray । मुंबई : राज्यात मागील वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पाडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंनी भाजपसोबत (BJP) युती करून नवीन सरकार स्थापन केले. त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्षफुटीवरून सतत उद्धव ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
आनंदाची बातमी! अवघ्या एका तासात मिटेल १२ वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद, ‘ही’ योजना येईल कामी
काल उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मस्टर मंत्री अशी टीका केली होती, त्यांच्या या वक्तव्याचा भाजपकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे हा नमकहराम माणूस आहे,” अशी जहरी टीका राणे यांनी केली आहे.
Rahul Gandhi । ब्रेकिंग! राहुल गांधी पुन्हा दिसणार संसदेत, अखेर मिळाली खासदारकी..
“उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी औरंग्याच्या विचारसरणीची असून जो स्वत:च्या वडिलांचा, धर्माचा, सख्ख्या भावाचा देखील होऊ शकला नाही. फडणवीसांनी त्यांचे सख्ख्या भावापेक्षा जास्त लाड पुरवले. आज त्यांना उद्धव ठाकरे नाव ठेवत असेल, तर ठाकरेपेक्षा नमकहराम कोणीच नाही. त्यांना बाप म्हणून कळून चुकल आहे की, माझ्या मुलाची दिवाळी आर्थररोड कारागृहात साजरी होईल. त्यामुळे तो राग, ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर काढत आहेत” असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.