
Sameer Wankhede CBI Probe : आज समीर वानखेडे यांच्या सीबीआय (CBI) चौकशीचा तिसरा दिवस आहे.एनसीबीचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. रविवारी जेव्हा ते चौकशी संपल्यानंतर बाहेर आले तेव्हा ते फक्त “सत्यमेव जयते” एवढेच म्हणाले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गंभीर टीका केली आहे. समीर वानखेडे भाजपची (BJP) पोल खोलू शकतात असं पटोलेंचं मत आहे.
Eggs | अंडे शाकाहारी की मांसाहारी? शेवटी प्रश्नाचं उत्तर मिळालंच…
“वानखेडे यांच्या सीबीआय चौकशीमध्ये काहीतरी शिजतंय. दाल में कुछ तो काला है, या फिर पुरी दाल ही काली है. समीर वानखेडेंजवळ भाजप आणि संघाविरोधात अशा काही वस्तू आहेत, ज्यामुळे ते त्यांची पोल खोलू शकतात. वानखेडे संघाच्या मुख्यालयात संघप्रमुखांना भेटून आले आहेत.त्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा भोवरा लागला. भाजपमधील नेते म्हणतं होते की, “वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. काही झालं तर आम्ही बघू”. सीबीआय व ईडी ही केंद्राची पाळीव कुत्री आहेत. त्यापैकी आता सीबीआय वानखेडे यांची चौकशी करत आहे. मग आता केसालाही धक्का लागू न देणारी भाजपची लोक कुठे गेली?”असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
भर लग्न मंडपात नवरा-नवरीची एकमेकांना तुफान मारहाण, व्हिडिओही झाला व्हायरल; पाहा Video
वानखेडेंबद्दल असं काय घडलं की मोहन भागवतांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा भोवरा लागला. याचं काळं पांढरं समोर येईलच. लपवलेल्या गोष्टी कळतीलच.यामधील काही गोष्टी संशयास्पद आहेत.असंही, नाना पटोले यांनी म्हटलं आहे. पक्षांनी चाचणी केली तरीही अंतिम जागा वाटपाचा निर्णय हा मेरिट वरच आहे. मविआच मेरिट जिथे असेल त्याप्रमाणे तिथले निर्णय घेतले जातील. पारंपारिक मतदारसंघाचा विषयच वेगळा आहे. जागा वाटपाबाबत आमच्या कमिट्या आम्ही तयार केलेल्या आहेत. मेरिटच्या आधारावर त्यावर चर्चा होईल, असंही नाना पटोले म्हंटले आहेत.
RCB च्या पराभवानंतर धक्कादायक ट्विट; “ऋषभ पंतच्या जागी शुभमन गिलचा अपघात…”