एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यांनतर भाजपशी हातमिळवणी करून राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन केले. शिंदे गट आणि भाजपने राज्यामध्ये सरकार स्थापन केले. जेव्हापासून सरकार स्थापन झाले आहे तेव्हापासून आमच्यात एकोपा आहे असं दोन्ही गटाकडून सतत दाखवलं जात. मात्र, असं असलं तरी शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व काही अलबेल नसल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश
शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. माध्यमांशी बोलताना खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले असून राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
खेळता खेळता स्मशानभूमीजवळ गेला अन् चार वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलं भयानक; वाचून बसेल धक्का
शिंदे गटाने २२ जागांवर दावा केला आहे काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी या प्रश्नच उत्तर देत ते म्हणाले, आमच्या २२जागा आहेत. दावा कशाला केला पाहिजे? असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, संजय राऊत हे रोज मनोरंज करत आहेत. घरात बसून आपलदेखील मनोरंजन होत आहे. त्यामुळे आम्ही त्यांना गंभीरपणे घेत नाही. असं देखील ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
डॉक्टरांनी मृत घोषित केले, काही वेळातच मृत रुग्णाचे पाय हलले अन्…; पुढील घटना वाचून बसेल धक्का