
Supriya Sule । अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्या रंगल्याचे पाहायला मिळत होते. या चर्चांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि भर घालत अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील असं म्हटल आहे. आता याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजितदादा जर मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार मीच घालेन असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. त्या आज नांदेडमध्ये आहेत त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी दररोज शरद पवारांना नाव ठेवावीत मात्र नांदेडमध्ये लोकांना योग्य उपचार द्यावा. नांदेडची घटना अतिशय हृदय हेलावून टाकणारी आहे. मृतांचा आकडा 24 38 41 नंबर फार दुःखद आहेत. ट्रिपल इंजिन सरकारला दिल्लीला जायला वेळ आहे मात्र नांदेडला येत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा निषेध करते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Amitabh Bachchan । अमिताभ बच्चन यांच्या अंगलट आली ‘ती’ जाहिरात, दाखल झाली तक्रार, नेमकं कारण काय?