
ताणतणाव, पैशाचे प्रॉब्लेम, या सर्वांमुळे अनेक लोक आत्महत्येला बळी पडत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून एका फळ व्यापाऱ्याने संपुर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आता ‘मागेल त्याला शेततळे मिळणार’; राज्य सरकारची मोठी घोषणा
हि धक्कादायक घटना बिहार या ठिकाणी घडली आहे. सावकाराच्या तगाद्याला कंटाळून एका कुटुंब प्रमुखाने संपुर्ण कुटुंब उद्धवस्त केले आहे. बिहारमधील एका फळ व्यापाऱ्याने आपल्या पत्नीसह चार मुलांना विष पाजून आत्महत्या केली आहे.
केबीसीच्या मंचावर बच्चनसाहेबांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, “लग्नानंतर मी देखील…”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फळ व्यापारी यांच्यावरती जवळपास १० ते १२ लाखाचं कर्ज होते. ते कर्ज परतफेड करण्यासाठी सावकाराने त्यांच्यामागे तगादा लावला होता. सावकाराच्या या कायमच्या त्रासाला कंटाळून फळ व्यापाऱ्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना विष पाजूत स्वत:चही आयुष्य संपवले. या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पुलिस यंत्रणा करत आहे.
राजू शेट्टी यांचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले,” शेतकऱ्यांकडून लुटलेला पैसा राजकारणासाठी…”