
उसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे सध्या राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आह. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ऊस परिषदेचे आयोजन करत आहेत. ऊस तोडणी मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार अडचणीत आले आहेत. असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळानं मजुरांची जबाबदारी घ्यावी अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे.
” ज्या कुटुंबामध्ये एक लाख टन ऊसाचं गाळप केलं जातं, त्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख जर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रमुख असेल तर हे ऑडीट नीट होईल का?” असा प्रश्न देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
बारामतीमधील भिगवण रोडवर पत्रकारावर गोळीबारप्रकरणी पाच जणांना अटक