
Shrigonda News l श्रीगोंदा (जिल्हा अहमदनगर) येथे संत शेख महंमद महाराज यांच्या समाधीस्थळावर ‘मंदिर की दर्गाह’ या प्रश्नावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादामुळे श्रोगोंद्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचं चित्र आहे.
संत शेख महंमद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत होते. मुस्लिम कुटुंबात जन्म होऊनही त्यांनी भागवत धर्म स्वीकारला आणि भक्तीमार्गाचा प्रसार केला. त्यांच्या कार्यामुळे त्यांना सर्व समाजातील लोक श्रद्धेने मानतात. त्यांच्या समाधीचा परिसर सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
या ठिकाणी ‘सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट’ नावाचा एक नविन ट्रस्ट स्थापन झाल्याने ग्रामस्थ आणि यात्रा समितीने नाराजी व्यक्त केली आहे. समाधी स्थळी मंदिर असावं, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेख महंमद महाराज हे संत परंपरेचे भाग आहेत आणि त्यामुळे ते फक्त एका समाजापुरते मर्यादित होऊ नयेत.
ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांनी या प्रकरणात उडी घेत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट आंदोलनस्थळी जाऊन “मंदिरच व्हायला हवं” अशी भूमिका घेतली आहे. तसेच, राज्य सरकारने या प्रकरणात त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन बेमुदत चालेल असा इशाराही दिला आहे.
Jayakwadi dam water Level । जायकवाडी धरणात पाण्याचा साठा कमी; बाष्पीभवनामुळे टंचाईचा धोका
स्थानिकांनी दर्गाह ट्रस्टला विरोध दर्शवत आंदोलन सुरू केलं असून, प्रशासनाकडून अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हा वाद अधिक गहिरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी ग्रामस्थांची आणि वारकरी संप्रदायाची मागणी आहे.