
Municipal Elections । महाराष्ट्रातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भात अखेर मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केल्यानंतर, निवडणुकीच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महापालिकांमधील सत्तांतराची प्रक्रिया सुरू होणार असल्याने, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हं दिसत आहेत.
Hiradgaon News । शालेय पोषण आहारात त्रुटी; हिरडगाव शाळेतील मसाले कालबाह्य
१७ जूनपासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली असून, ती ६ ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. या प्रक्रियेत प्रारूप तयार करणे, जनतेकडून हरकती मागवणे, सुनावण्या घेणे आणि अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे टप्पे असणार आहेत. मुंबईसह इतर ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये अंतिम प्रभाग रचना अनुक्रमे ६ आणि १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे पुढील टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता अधिक ठळक झाली आहे.
या वेळापत्रकानुसार, ३१ जुलैपर्यंत प्रभाग रचनेचं प्रारूप तयार होणार असून, त्यानंतर १ ते ११ ऑगस्टदरम्यान हे प्रस्ताव संबंधित विभागांकडे सादर करण्यात येतील. नागरिकांकडून हरकती आणि सूचना २२ ते २८ ऑगस्टदरम्यान मागवण्यात येणार असून, ८ सप्टेंबरपर्यंत त्या सुनावण्या घेतल्या जातील. अंतिम मसुदा तयार करून २२ सप्टेंबरपर्यंत आयोगाकडे सादर केला जाईल. अंतिम अधिसूचना ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान प्रसिद्ध केली जाणार आहे.
Sonam Raghuvanshi Case । हनीमूनच्या नावाखाली घात: नवविवाहितेचा कट उघड – मेघालयात नवऱ्याचा खून
या प्रक्रियेनंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मतदानाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून, नव्या प्रभाग रचनेनुसार उमेदवारांची निवड, युती-आघाड्यांचं गणित आणि प्रचाराची रणनीती ठरवण्याकडे लक्ष दिलं जात आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरती मर्यादित राहणार नसून, ती राज्याच्या राजकारणावरही परिणाम करणारी ठरू शकते. कोरोना, ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि प्रशासनाच्या निर्णयांमुळे रखडलेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मतदारांपासून राजकीय पक्षांपर्यंत सर्वांच्या नजरा आगामी निवडणुकांवर केंद्रित झाल्या आहेत.