Kharip Hangam | खरीप हंगामासाठी बियाणे, किटकनाशके आणि खते खरेदी करताय ? मग ही काळजी घ्याच, अन्यथा होईल नुकसान !

pc facebook

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अतिशय वेगाने खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत पूर्ण केली असून त्यांनी बियाणे खरेदीसाठी हालचाल सुरू केली आहे. याकाळात विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या घटना बऱ्याचदा घडतात. यामुळे या खरीप हंगामामध्ये (Kharip Hangam) शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके आणि औषधे खरेदी करावेत असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार

कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचना

१) शेतकऱ्यांनी कोणतीही बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खरेदी करावीत.
२) या पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पीक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी.
३) खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
४) भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पॉकेट सिलबंद असल्याची खात्री करावी.

गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार? रीलस्टारने केला मोठा खुलासा म्हणाली…

शेतकऱ्यांनी शेतात बियाणे पेरण्याआधी शेतकऱ्यांनी त्याची उगवण क्षमता घरीच तपासून पहायला हवी. तसेच बियाण्यांचा पाकिटावरील अंतिम मुदत देखील तपासावी. तसेच किटकनाशके व खते विकत घेताना सुद्धा शेतकऱ्यांनी त्याची अंतिम मुदत तपासावी. या व्यक्तिरिक्त फसवणुकींच्या तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.

निळू फुलेंच्या मुलीची राजकारणात एन्ट्री; विधानसभेपूर्वीच केला ‘या’ पक्षात प्रवेश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *