
Eknath Shinde । ठाण्याजवळ शहरापुरी तालुक्यातील सरलांबे या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम चालू आहे. यावेळी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम चालू असताना गार्डर मशीन कोसळल्याची या ठिकाणी घटना घडली आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर चार पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. एकमनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Samruddhi Mahamarg Thane । समृद्धी महामार्गाचे काम चालू असतानाच घडली मोठी दुर्घटना! 17 जण जागीच ठार
पाहा एकनाथ शिंदे यांचे ट्विट
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.
आज पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
मोठी बातमी! ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफ चे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.