
मुंबई : सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा (N V Ramana)हे शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. यामुळे त्याचा सेरेमोनियल बेंचमध्ये निरोप समारंभ देखील घेण्यात आला. यावेळी बोलताना अटर्नी जनरल केके वेणूगोपाल म्हणाले की, रमणा यांच्या निवृत्तीमुळे आम्ही एक बुद्धिजीवी आणि एक उत्कृष्ट न्यायाधीश गमवलाय. तर वरिष्ठ वकील दुष्य़ंत दवे यांना कोर्टामध्येच अश्रू अनावर झाले.
Jammu kashmir: उरी सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
वरिष्ठ वकील दुष्य़ंत दवे म्हणाले, रमणा हे जनतेचे न्यायाधीश आहेत. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झाली की मुख्य न्यायमूर्तींचे सेरेमोनियल बेंचमधून लाईव्ह स्ट्रिमिंग झाले. ज्याचे सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर वेबकास्ट करण्यात आलंय.
सेवानिवृत्तीच्या भाषणामध्ये बोलताना रमणा यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आर्टिफिशियल एंटिलिजेन्स ची आवश्यकता भासते. पण हे बाजारातून देखील खरेदी करता येणार नाही असेही रमणा यांनी स्पष्ट केले. रमणा म्हणाले की असे भरपूर मुद्दे आहेत, यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण पद सोडण्याआधी त्यावर बोलणार नाही, असे देखील ते म्हणाले