
देशातले बहुसंख्य शेतकरी पीएमकिसान योजनेचा (PM Kisan Yojna) लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही हप्त्यांमध्ये पीएम किसान सन्मान निधी जमा करण्यात येतो. या योजनेचा 12 वा हप्ता नुकताच जमा झाला असून पुढील हप्त्यासाठी यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता पीएम किसान योजनेमध्ये रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
तरुणांसाठी आनंददायक बातमी! राज्यात 18 हजारांपेक्षा जास्त पोलीस पदांची भरती; असा करा अर्ज
पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड जमा करणे बंधनकारक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रेशनकार्ड ची सॉफ्ट कॉपी जमा करणे गरजेचे आहे. अशी माहिती सरकारने दिली आहे. इतकेच नाही तर यावेळी शेतकऱ्यांना eKYC सुद्धा करावी लागणार आहे. पीएम किसानच्या pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर याबाबद्दल अधिक माहिती उपलब्ध आहे.
कांद्याच्या दरात घसरण; शेतकऱ्यांना मोठा फटका
देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. परंतु, 2 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. नियम व अटींचे पालन न केल्याने या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे तुमच्या 13 व्या हप्त्याचे अडकू नयेत म्हणून तुम्ही रेशन कार्ड जमा करून eKYC ही करायलाच हवी.
दारूच्या नशेत चार मुलींनी मिळून एका मुलीला केली बेदम मारहाण; पाहा VIDEO