
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार राजभवनर या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. पण, अजून देखील खातेवाटप मात्र झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पुण्यात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत अजित पवार यांनी नवं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का? या प्रश्नावर देखील वक्तव्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले, “त्यांच्या मनात अशी भिती का यावी? ते राजकीय शहीद झाले असते की खरोखर शहीद झाले असते ते कसं सांगावं? पण राज्यातल्या जनतेला या प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही”, अशा खोचक शब्दांमध्ये शिंदे सरकारवर टीका केली आहे.