
Prakash Ambedkar । वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सध्या एक मोठे वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सहा महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण हे कोणालाच माहीत नव्हत. मात्र हा सामान्य माणूस आज शरद पवारांचा बाप झालाय. असे वादग्रस्त विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले असून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोमवारी प्रकाश आंबेडकर परभणीमध्ये ओबीसी भटके विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना इतिहासामध्ये नाव करण्याची संधी आहे. त्यांना नवीन इतिहास घडवण्याची संधी आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
परभणीत ओबीसी भटके विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे, शरद पवार, भाजप आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले. जरांगे पाटील हे आज शरद पवार यांचे बाप झाले आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला देखील दिला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी ही लढायला तयार आहे. मात्र ओबीसींची अट तुम्ही मान्य केली पाहिजे. त्यांची एवढीच अट आहे की आमचं ताट आम्हाला राहू द्या.. आपण वेगळं ताट काढू.. यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देऊ. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा