
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतले ( Shivsena) आमदार फोडून बंड पुकारले होते. दरम्यान या बंडखोरी वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि बंडखोर आमदारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे (udhav Thakarey)यांच्या बद्दल बोलण्यास टाळले होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबीयांबद्दल बोलताना अपशब्द वापरु नये अशा सख्त सूचना दिल्या होत्या. पण आता शिंदे गटाने भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले. आणि त्यामुळे सत्ताधारी आणि ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाले.
Ramdas Athawale: ‘या’ महिन्यात होणार महापालिका निवडणुका, आठवलेंनी सांगितली महत्वाची माहिती
दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज्यात कंत्राटीकरण कसे वाढले जात आहे. याची उदाहरणे दिली होती. प्रत्येक गोष्टीचे कंत्राट निघत असेल तर राज्यकर्तेही कंत्राटीच करा असे म्हणत त्यांनी (State Government) राज्य सरकारवर टीकास्त्र केले होते. दरम्यान आता याच टीकेला प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जशाच तस उत्तर दिले आहे.मी कंत्राटीच मुख्यमंत्री पण राज्याच्या विकासाचे आणि बाळासाहेबांच्या विचार जोपसण्याचे कंत्राट मी घेतलय अस एकनाथ शिंदे म्हणाले.विकासाचे ठीक आहे पण बाळासाहेबांच्या विचाराचे म्हणत त्यांनी पुन्हा ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
राज्य सरकारकडून सर्वच बाबी आता कंत्राट देऊन पूर्ण केल्या जात आहेत. सर्वच गोष्टी कंत्राटी पद्धताने पूर्ण करुन घ्यावयाच्या असतील तर राज्यकर्तेही कंत्राटी म्हणूनच नेमा, शिवाय मुख्यमंत्री तरी कशाला निवडायचा आहे, ते पदही कंत्राटी पद्धतीने अंमलात आणावे असे विधान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून केले होते.