
राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सतत टीका करत आहे. दरम्यान ही स्थिती असताना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.
“शरद पवार यांना फडणवीसांची भीती वाटत होती”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठं वक्तव्य
या मुलखीमध्ये आदित्य ठाकरे यांनी अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. त्याचबरोबर आज ना उद्या शिंदे गटातील आमदारांचं निलंबन होणार म्हणजे होणार. असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर या मुलखींतमध्ये त्यांना काही प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत.
अदानी समूहाला तिसरा मोठा धक्का; ‘या’ बड्या कंपनीने केला करार रद्द!
आदित्य ठाकरे यांना यावेळी विचारण्यात आले तुमचे लग्नाचे वय झाले आहे आता तुम्ही लग्न कधी करणार?. या प्रश्नाचं उत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले, , “हा प्रयत्न तुम्ही चार वर्षापूर्वी देखील केला होता. आताही करत आहात. त्यामुळे आपण सध्या राजकारणवर लक्ष केंद्रीत करु” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिल आहे.
पापरांझीसमोर ढसाढसा रडताना राखीने स्वतःलाच मारली चापट; नक्की काय घडलं? जाणून घ्या