Site icon e लोकहित | Marathi News

Eknath Shinde: नेमका काय उद्देश आहे शिंदे सरकारचा दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा

What is the exact purpose of the Shinde government to give Dahihandi the status of an adventure sport?

मुंबई : कोरोना महामारीनंतर महाराष्ट्रात दहीहंडी(Dahihandi) उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे इतर खेळांप्रमाणेच या खेळातील गोविंदांना (Govinda)सरकारी नोकरीमध्ये कोटा मिळणार असल्याची घोषणा केली.

शिंदे यांच्या या घोषणेवर विरोधकांकडून सडकून टीका झालेली पाहायला मिळालं आहे.’गोविंदा’ कोट्याअंतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील. त्यांना मिळालेल्या रोजगारामुळे शिंदे गटाला मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह सर्व महानगरपालिका निवडणुकीत मतांच्या रूपाने त्याचा फायदा होऊ शकतो.

Tamhini Ghat : ताम्हिणी घाटात भीषण अपघात, कार 200 फूट घसरली, 3 जण जागीच ठार

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांवर मुलांवर अन्याय

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या या निर्णयावर आक्षेप नोंदविला आहे. अशा प्रकारे नोकरीत आरक्षण देणे म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांवर अन्याय होत असल्याचं अजित पवार म्हणाले. गोविंदांमध्ये प्रामुख्याने कनिष्ठ मध्यमवर्गातील मराठी भाषिक तरुणांचा समावेश आहे.त्यामुळे हा समाज इतके दिवस शिवसेनेचा मतदार म्हणून ओळखला जातो होता.एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील ठाकरे गट अडचणीत सापडल्याचे दिसतंय.

Shah Rukh Khan : शाहरुख खानचे आजोबा शाहनवाज खान यांनी उतरवला होता लाल किल्ल्यावरून ब्रिटिश ध्वज , जाणून घ्या सविस्तर

गुंतवणूक व दीर्घकालीन संपत्ती म्हणजे गोविंदा

एका राजकीय विश्लेषकाने सांगितले की, ” राजकीय पक्षांसाठी एखाद्या प्रदेशात आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी गोविंदा ही एक गुंतवणूक आहे. आर्थिकदृष्ट्याही कोणत्याही पक्षाला निधी देणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे ही महागडी गोष्ट नाही. त्यातच निवडणुकीच्या वेळी ते त्यांच्या कामी येतात.

Sudha Murti : पद्मश्रीने सन्मानित सुधा मूर्तींचा प्रेरणादायी प्रवास ; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version