
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(udhav Thakarey) यांनी आज पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे.ती महत्वाची घोषणा म्हणजे शिवसेना(shivsena)आणि संभाजी ब्रिगेड (sambhaji brigade)हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत.यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे(Manoj Akhare), पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. आज शिवसेना सत्तेत नसताना संभाजी ब्रिगेड आमच्यासोबत आले, याचा मोठा आनंद आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय.
N V Ramana: सरन्यायाधीश रमणा यांचा शेवटचा दिवस, सेवानिवृत्ती कार्यक्रमात झाले नाराज
उद्धव ठाकरे काय म्हणाले
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे.तसेच महाराष्ट्रात सध्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो.
येत्या काही काळात सुप्रीम कोर्टात जो लढा सुरु आहे, हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचाच आहे असे नाही.तर देशात लोकशाही असेल का बेबंदशाही, याचा निकाल लागणार आहे. आपण सगळे शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ आपण सगळे एकच आहोत.
Jammu kashmir: उरी सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
मराठी माणसाला दुहीचा शाप गाढत आलाय. या शापालाच आपण गाढून टाकूत.सत्तेत असताना तर कुणीही साथ देऊ शकतात, मात्र शिवसेना आज संघर्ष करत असताना सोबत आले ते खरे लढवय्ये, तेच खरं शौर्य असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
आम्ही एकत्रपणे लढू
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा पक्षांशी आघाडी करून भविष्यात नवी वाटचाल सुरु करावी, असं आम्ही विविध संघटनांना आवाहन केलंय.तसेच पुढे मनोज आखरे म्हणाले की, भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीत आम्ही एकत्रपणे लढू, असं इथे जाहीर करतो.
Virat kohali: विराट कोहली धोनीच्या आठवणीत झाला भावूक, फोटो शेअर करत म्हणाला…