
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) काल मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते मुंबईमधील विकास कामांचे लोकार्पण आणि त्याचबरोबर काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. यामध्येच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान या मुद्द्यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
पट्ठ्याने मैदान गाजवलं! विसापूरमध्ये अनुभवी पैलवानांना लोळवत सिकंदरने जिंकलं ५ लाखांचं बक्षीस
गजानन काळे म्हणाले, संजय राऊत वेड्यांच्या रूग्णालयामध्ये होते की कोठडीत असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. संजय राऊतांना फक्त बेळगाव प्रश्नाचे पडले आहे असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.
पट्ठ्याने मैदान गाजवलं! विसापूरमध्ये अनुभवी पैलवानांना लोळवत सिकंदरने जिंकलं ५ लाखांचं बक्षीस
त्याचबरोबर पुढेच ते म्हणाले मागची २५ वर्ष ज्या सत्ताधाऱ्यांनी या मुंबईची वाट लावली आहेत त्यावर आदित्य ठाकरे आता पत्रकार परिषद घेतायत”, असा टोला देखील मनसे नेते गजानन काळे यांनी लगावला आहे.