
मागील तीन-चार दिवसांत सोशल मीडियावर आयपीएलमध्ये (IPL) सोमवारी (ता.१ मे) झालेल्या सामन्यातील वादाची चर्चा सुरू आहे. RCB आणि LSG यांच्यात झालेल्या या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंची तुफान वादावादी झाली. या सामन्यामध्ये विराट कोहली चक्क चार खेळाडूंसोबत भिडला होता. यामध्ये गौतम गंभीरचा सुद्धा समावेश होता. ( Virat Kohali & Gautam Gambhir) या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने केलेल्या कारवाईमध्ये सर्व खेळाडूंना दंड ( Penelty) ठोठावण्यात आला आहे.
Anil Dujana | मोठी बातमी! उत्तरप्रदेशमध्ये आणखी एका गँगस्टरचा इन्काऊंटर; जागीच झाला ठार
हा दंड म्हणजे एका सामन्याचे शंभर टक्के मानधन! ही रक्कम एक कोटी एवढी आहे. परंतु, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली या दंडातील रकमेचा एक रुपया सुद्धा भरणार नाही. या सामन्यात विराट कोहली लखनौच्या टीम मधील नवीन-उल-हक, अमित मिश्रा, काईल मेयर्स व गौतम गंभीर यांच्यासोबत भांडला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाचा व्हिडीओ तर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी वादातील सर्व खेळाडूंना दंड भरायला लागणार होता. मात्र विराट कोहली हा दंड भरणार नाही.
Viral Video | अजगराने केले बकरीला फस्त आणि नंतर…
“आमच्या खेळाडूंचे काम फक्त खेळणे आहे. आम्ही त्यांच्या खेळाचा सन्मान करतो. आम्ही दिलेल्या मानधनातून दंडाची रक्कम वजा केली जात नाही.” असे आरसीबीचे म्हणणे आहे. यामुळे विराट कोहली दंडाची रक्कम भरणार नसून आरसीबी ही रक्कम भरणार आहे. बाकी इतर खेळाडूंचा दंड देखील त्यांचा संघ भरणार आहे.