Site icon e लोकहित | Marathi News

‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियानांतर्गत सरकारने स्वीकारले बालकांचे पालकत्व

Under the 'Aware Parents-Strong Child' campaign, the government has adopted the guardianship of children

शिंदे-फडणवीस सरकारचे ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियान. राज्यातील सर्व (ग्रामीण, शहरी व मनपा विभाग) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ९ फेब्रुवारी पासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. याबाबत वासुदेव नाना काळे यांनी माहिती दिली आहे.

महिलांच्या हाती कोयता पुणे असुरक्षित झाले का? वसंत मोरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या अभियानाची दौंड तालुक्यात देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्रात वासुदेव नाना काळे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरवात केली. यावेळी बोलताना वासुदेव नाना काळे म्हणाले, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, प्रत्येक बालकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचवावा. असं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.

‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरे अन् अजित पवार यांनी सांगूनही मी अर्ज मागे घेतला नाही; राहुल कलाटेंनी स्पष्टच सांगितलं कारण

या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी वासुदेव नाना काळे, डाॅ. अविनाश अल्लेवार, डाॅ अर्चना वाघमोरे, डाॅ.रचना मॅडम, सरपंच स्वाती गिरमकर, उपसरपंच सौ. गिरमकर . भिमा सह. कारखाना संचालक तुकाराम अवचर, पोपटराव खोसरे, राजाभाऊ बुऱ्हाडे, विष्णुपंत सुर्यवंशी , विनायक भोसले, हनुमंत कामठे, जयवंत गिरमकर , हनुमंत कोपनर , काका कड , ज्ञानेश्वर भोसले, लाला गिरमकर, नंदु काळे , महादेव काळे, तुकाराम कोर्हाळे. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका , ग्रामसेवक, गावकामगार तलाठी , व ग्रामस्थ पालक इत्यादी उपस्थित होते.

महिलांच्या हाती कोयता पुणे असुरक्षित झाले का? वसंत मोरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Spread the love
Exit mobile version