
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर वक्तव्य केले आहे. त्यांच्या खळबळजनक वक्तव्याने खरंतर अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे सरकारच्या काळात भगतसिंग कोश्यारी यांना विमानातून उतरवण्यात आले होते. याचा संदर्भ देत भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे.
ऐश्वर्या रायने चक्क विमानाच्या टॉयलेट मध्ये पिले सिगारेट; जाब विचारताच शाहरुख खानचे नाव केले पुढे
उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना बळीचा बकरा करण्यात आलं आहे. मी देवापुढे प्रार्थना करतो की ठाकरेंनी या सगळ्यापासून लांब रहावं. उद्धव ठाकरेंना बळच मुख्यमंत्री केले गेले. त्यांनी मला एकदा विमानातून उतरवले मात्र नियतीने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून, त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं. मी उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचलं नाही, पण नियतीने जे करायचं ते केलं असे म्हणत कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारला आहे.
मोठी बातमी! अदिलने कोर्टातच दिली राखीला धमकी; म्हणाला, “मी बाहेर आल्यावर…”
तसेच पुढे बोलताना भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsing Koshyari) यांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली आहे. उद्धव ठाकरे हे संत आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती तरीही त्यांना जबरदस्ती मुख्यमंत्री करण्यात आले. इतकंच नाही तर शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही. अशी खोचक टीका कोश्यारी यांनी यावेळी केली.