
Uddhav Thackeray । शिवसेने सोबत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. यानंतर हे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या देखील शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे गटाला एक ओपन चॅलेंज दिले आहे. “40 आमदारांपैकी एकाने जरी 50 खोके घेतले हे सिद्ध केले तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घासले. असं चॅलेंज रामदास कदम यांनी दिले आहे. कोल्हापूर या ठिकाणी शिवसेनेचे पहिले महाअधिवेशन सुरू होते. यामध्ये रामदास कदम बोलत होते.
Ajit Pawar । “…तर मी निवडणूक लढवणार नाही”, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य
त्याचबरोबर यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. राम कदम म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मला काम करण्याची अनेक वर्ष संधी मिळाली. मात्र महाराष्ट्रामध्ये बाप-बेटे असे दोघेजण उद्धव ठाकरे आणि त्यांचे पिल्लू यांचं दोघांचं जर बोलणं आपण ऐकलं, त्यांचे टोमणे जर आपण ऐकले, विझताना जसे आपण फडफडतो तसे ते आता फडफडत आहेत. अशी टीका रामदास कदम यांनी केली.
त्याचबरोबर पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, “उद्धव ठाकरे याना ईडी लागली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला देखील समजलं पाहिजे की भ्रष्टाचारी कोण आहे. आम्ही मातोश्रीवर पुष्कळदा खोके दिले. पण मातोश्रीला दोन-चार खोके देऊन चालत नाही. असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Dhangar Reservation । बिग ब्रेकिंग! धनगर समाजासाला मोठा धक्का; आरक्षणाची मागणी फेटाळली