
मागील काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. यावेळी भाजपसोबत युती करून त्यांनी राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेमध्ये मोठी दरी पडली व ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यानंतर शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला. दरम्यान याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी आहे.
सध्या चर्चेत असलेले बागेश्वर बाबा नेमके आहेत तरी कोण? वाचा सविस्तर माहिती
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या याचिकेतील मुद्दे खोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्यांवर युक्तिवाद केला आहे. दरम्यान त्यांनी शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असून त्यामध्ये 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत, असे सांगितले आहे. तसेच हा वाद संसदीय पद्धतीची थट्टा ठरला आहे. शिवसेनेच्या सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच झाल्या आहेत त्यामुळे ठाकरे गटच खरी शिवसेना ( Shivsena) असून ठाकरे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
धक्कदायक! पेपर लिहीत असतानाच ९ वर्षीय मुलीचा मृत्यू
दरम्यान बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने लोकशाहीनुसार आपलं म्हणणं मांडायला हवं होतं, एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत कार्यरत होते मग ते पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहाटीला गेले होते. ते गुवाहाटीला का गेले? तसेच राजकीय पक्ष ( Political party) म्हणून शिंदे गटाने कोणती कागदपत्रे सादर केली आहेत का ? असे प्रश्न कपिल सिब्बल यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
गरोदरपणातही ऊसाच्या फडात काम करणाऱ्या महिलांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल