Site icon e लोकहित | Marathi News

कोल्हापूरच्या घटनेवर ठाकरे गटाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “विरोधी पक्ष कधीही मागे…”

Thackeray group's big reaction to Kolhapur incident; Said, "Opposition never back..."

महाराष्ट्र (Maharashtra) देशाची भूमी थोरांची, संतांची आणि वैचारिक लोकांची मानली जाते. परंतु त्याच भूमीत कोणत्या ना कोणत्या कारणावरून महापुरुषांना वेठीस धरलं जात. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आता मागे पडतोय की, काय अशी परिस्थिती आहे. इथे जन्मलेल्या महापुरुषांनी अवघ्या जगाला शिकवण दिली. परंतु आज महाराष्ट्रात अजबच घटना घडत आहेत. या सर्व अनपेक्षित घटनात्मक सूत्रधार कोण आहे? याचा तपास पोलीस यंत्रणा आणि सरकार करत आहे. परंतु या सर्व मुद्द्यांवर विरोधी पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि विरोधी पक्ष नेते अनिल परब (Anil Parab) यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे.

धक्कादायक घटना! खेळता खेळता तब्बल ३०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली चिमुरडी, मग त्यानंतर…

“मागच्या दहा महिन्यांपासून जे चालू आहे ते खूप विशेष आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच त्याच घटना पुन्हा घडत आहेत. कोल्हापुरात झालेल्या (Kolhapur Riot) दंगली भयानक आहेत. महाराष्ट्रात जर असंच वातावरण राहिलं तर महाराष्ट्राचा विकास होणार नाही. गुंतवणूकदार महाराष्ट्रात यायला कानकून करतील. लोकांचे ज्या गोष्टींकडे लक्ष असायला हवं तिथून ते दुसरीकडेच भरकटवले जात आहे”, असे अनिल परब म्हणाले आहेत.

पावसाबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट; पुढील दोन तीन दिवस महत्वाचे

“राज्यात या ज्या काही दंगली घडत आहेत त्यांना रोखण्यासाठी विरोधी पक्ष देखील मागे राहणार नाही. परंतु या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन यामागे कोण दडलं आहे त्याचा तपास घेणे गरजेचे आहे. या गोष्टींना कोणता राजकीय पक्ष पाठिंबा देत आहे का? हे देखील शोधणे गरजेचे आहे. या गोष्टींसाठी जो कोणी जबाबदार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे”. असं देखील अनिल परब म्हणाले आहेत.

Sonu Sood । ओडिशा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूदने पुढे केला मदतीचा हात!

“पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची कामे अगदी चोखपणे कोणालाही न घाबरता केली पाहिजेत. या प्रकरणांचा योग्य तपास लावून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे”. अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.निवडणुकांसाठी हे सर्व केलं जात आहे का? असा सवाल अनिल परब यांना विचारण्यात आला त्यावर ते प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “खरं सांगायचं तर दोन्हीही शक्यता आहेत. अशा दंगलींमुळे एक तर निवडणूक रद्द होतील किंवा त्या लांबनिवर जातील”. अशी परखड प्रतिक्रिया अनिल परब यांनी मांडली आहे.

बिबट्या घरात घुसला, शिकारही सापडली नाही मग त्याने पळवली ‘ही’ वस्तू; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

Spread the love
Exit mobile version