
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी एक मोठे राजकीय बंड केले होते. या राजकीय बंडाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक परिणाम झाले. त्यात महाविकास आघाडी कोसळून राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आले. तसेच या बंडापासून ठाकरे गटाला गळती लागली. तेव्हापासून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नेते शिंदे गटात जात आहेत.
“अन् त्याने चक्क गुटखा थुंकण्यासाठी उघडायला लावली विमानाची खिडकी”; पाहा VIDEO
दरम्यान ठाकरे गटातील आणखी आमदार व खासदार शिंदे गटात जाणार असल्याची माहिती शिंदे गटातील एका खासदाराने दिली आहे. या आमदार खासदारांच्या स्थानिक अडचणी असल्याने ते थांबून आहेत. मात्र, अगामी निवडणूकांपूर्वीच ते शिंदे गटात सामील होतील. अशी माहिती बुलढाणा ( Buldhana) जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.
“…अन्यथा आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता”; त्या प्रसंगातून अजित पवार थोडक्यात बचावले
महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav) हे देखील आधी ठाकरे गटात होते व काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. संजय यांनी शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरून ठाकरे गट रिकामा केला आहे. सध्याच्या ठाकरे गटाच्या परिस्थितीला राऊत जबाबदार आहेत. असा आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
कलिंगड शेतीतून तरुण घेतोय लाखोंचे उत्पादन; युवा शेतकऱ्याचा हा प्रयोग वाचून तुम्हीही व्हाल थक्क!