
राज्यात मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदन साजरे केले जात आहे. यामध्ये सामान्य लोकांपासून ते कलाकार आणि राजकीय नेते सर्वचजण धुलिवंदन साजरी करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या घरी, धुलिवंदन साजरं केलं जात आहे. यामध्येच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील धूलिवंदन साजरं केलं.
मात्र आता धुलीवंदनाच्या निमित्ताने हीच कटुता कमी करण्यासाठी भाजपने (BJP) पाऊल उचलल्याचं दिसून आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजप कार्यालयात धुलिवंदन साजरं केलं आहे. धूलिवंदन साजरं केल्यांनतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची खेडमध्ये 19 मार्चला सभा
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ विधानसभेत आम्ही सांगितलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला आहे. त्या सर्वांचा बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की आम्ही त्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात कोनाबद्दलच कोणतीही कटुता नसल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
शरद पवार यांना मोठा धक्का! ‘हे’ राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार?
त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. बावनकुळे म्हणाले, “मी राऊतांना विनंती करतो की त्यांनी आजपासून मनभेद आणि मतभेद बाजूला सारुन एकत्रितपणे महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम करावं”, असे आवाहन यांनी केले आहे. त्यांच्या या आव्हानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, भाजपने ठाकरेंसोबत कटुता संपवण्याचं मनावर घेण्याचं चित्र सध्या दिसत आहे. यामुळे आता आता ठाकरे यावर काय उत्तर देणार? भाजपच्या या भूमिकेकडे ठाकरे गांभिर्याने घेत आपली दिशा बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.