
श्रीगोंदा: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत होत्या. यामध्येच आता त्यांच्या या वक्तव्यामुळे आज श्रीगोंदा बंदची हाक दिली आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
खुशखबर ! महामार्गावरील टोल नाके आता बंद होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय
दि. १३ रोजी सायंकाळी संत शेख महमंद महाराजांच्या मठात याबाबत बैठक पार पडली. जवळपास ५० ते ६० प्रमुख नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत एकमताने मोर्चा व श्रीगोंदा तालुका बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ यंत्रासाठी मिळणार कोटींचे अनुदान
यावेळी राजेंद्र म्हस्के, घनश्याम शेलार, स्मितल वाबळे, अॅड. संभाजी बोरुडे, प्रा. बळे सर, बाळासाहेब दूतारे, अरविंद कापसे, समीर शिंदे, गोरख घोडके, आदिसह कार्यकर्ते देखिल उपस्थित होते.