
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडींना वेग आला आहे. मागच्या दोन तीन दिवसापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांनतर काल अजित पवार भाजपात जाणार असे अंजली दमानिया यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली. त्याचबरोबर मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार सध्या भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहेत. आता हे सर्व सुरु असताना फडणवीसांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलीला मिळणार 2 लाख रुपये; ‘या’ नेत्याने केली मोठी घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे योग्य वेळी त्यांचा त्यांचा पक्षप्रवेश होईल, असं फडणवीस म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे.
गोमूत्र ठरतंय आरोग्याला हानिकारक! संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती; वाचा सविस्तर
पाहा नेमकं काय म्हणाले फडणवीस?
आमदार कायमच संपर्कात असतात. मागच्या पाच वर्षात पाहिलं तर सत्ताधारी पक्ष म्हणू काम करताना अनेकांशी संबंध निर्माण झाला आहे. त्यामुळे आमच्या संपर्कात अनेक जण आहेत. त्यामुळे संपर्कात जास्त लोक असले तरी भाजपमध्ये किती लोक प्रवेश करतील हे निश्चित सांगता येणार नाही. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
कापूस, तूर, सोयाबीनच्या दरात चढउतार होणार! जाणून घ्या सविस्तर