
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar) यांनी विद्यार्थ्यांना सल्ला देताना अतिशय गंभीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणाले, विद्यार्थ्यांना मी सांगितलय तुमचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार आणि खासदारांना मारा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना बडवावे, असं मोठं आणि धक्कादायक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
‘ही’ आहे रोहित पवार यांची आवडती अभिनेत्री; रोहित पवारांच्या ‘त्या’ उत्तराची सर्वत्र चर्चा!
राज्यातील ८६१ विद्यार्थी बार्टीची फेलोशिप मिळावी यासाठी मागच्या महिन्यापासून आंदोलन करत आहेत मात्र या विद्यार्थ्यांकडे कोणी लक्ष देताना दिसत नाही. या सर्व पार्शवभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पंजाब हरियाणा मधून आणलेल्या गाईचा उन्हाळ्यामुळे होतोय मृत्यू
काल प्रकाश आंबेडकर यांनी आझाद मैदानात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (Prakash Ambedkar interacted with students at Azad Maidan.) यावेळी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मोठी बातमी! शरद पवारांबाबत काँग्रेस नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट