
मुंबई : राजस्थानातील जालौर येथील सांचोर येथे आर्थिक अडचणीमुळे त्रासलेल्या एका पित्याने आपल्या 11 महिन्यांच्या मुलाला नर्मदेच्या कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सुमारे २४ तासांनंतर या बाळाचा मृतदेह(Deadbody) सापडला आहे.पोलिसांनी (police)या प्रकरणात आरोपी पित्याला अटक केली आहे.आरोपी मुकेश (mukesh)हा 24 वर्षांचा असून, बनासकाठा येथील नलोधर गावातील रहिवासी आहे.पोस्टमार्टेनंतर या बाळावंर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेमकी घटना काय घडली?
आरोपी मुकेशने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह(Love marriage) केला होता. प्रेमविवाह केल्याने घरातले नाराज होते.आणि त्याच्याकडे कोणतीही नोकरी(Job) नव्हती. नोकरी नसल्याने कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यामुळे त्याने आपल्या बाळाचा जीव घेण्याचे ठरवले. या बाळाला त्याच्या आजी आजोबांकडे सोडून येऊ असे सांगून त्याने आपल्या पत्नीला आणि लहान बाळाला गुजरातवरुन राजस्थानात आणले होते.
घरचे नाराज असल्याने मी एकटाच बाळाला सोडून येत अस सांगून तो बाळाला एकट्यालाच घेऊन गेला. 200 मीटरवर असलेल्या नर्मदेच्या कालव्यात या लहान बाळाला फेकून तो परतला. आणि पत्नीला सांगितले की घराच्या बाहेरच बाळाला सोडून मी आलो आहे.
पोलीसमित्र असलेल्या कानाराम याने या दोघा पतीपत्नीला मुलासह पाहिले होते. नंतर काही काळाने त्यांच्याकडे मूल नव्हते. त्यामुळे काना रामला संशय आला. त्याने ही माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी आरोपी मुकेशला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला.