
मुलांचे आईवडील संपूर्ण हट्ट पूर्ण करत असतात. मुलं सर्वात जास्त आपल्या आई-वडिलांवरती विश्वास ठेवतात. त्यांना आई-वडिलांपासून कोणत्याच गोष्टीची भीती नसते. मात्र सध्या वडील आणि मुलांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कदायक घटना समोर आली आहे.
बिग ब्रेकिंग! भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा अपघात
सध्या औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका वडिलांनी आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
“रस्ते चांगले करा, नाहीतर ठेकेदारालाच बुलडोझर खाली टाकू” – नितीन गडकरी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये वडिलांचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर औऱंगाबादेतील घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. मृत झालेल्या वडिलांचं नाव भगवंत काळे असं आहे. बाहेर फिरायला घेऊन जातो असं सांगत त्यांनी मुलांना विष पाजले आहे.
‘या’ आजारामुळे अनंत अंबानीचे वजन वाढले आहे, नीता अंबानी यांनी केला मोठा खुलासा
या पित्याने आपल्या पोटच्या लेकरांना विष का पाजले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.