
आपण अनेकवेळा लहान मुलांच्या अपहरणाच्या बातम्या ऐकत असतो. दरम्यान अशातच एतमाद-उद-दौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा शंभू नगरमध्ये एका नातेवाईकाने 4 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. आणि त्या लहान मुलाच्या छातीत गोळी झाडून त्याची हत्या केली आहे. एकुलत्या एक मुलाच्या हत्येनंतर आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आता दिवाळीत फटाक्यांचा ‘आवाज’ नियंत्रणात राहणार, वाचा सविस्तर
नेमक प्रकरण काय आहे?
एतमाद-उद-दौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंभू नगर (नारायणच) येथील रहिवासी बबलू दक्षा हा चांदीच्या पायघोळचा कारागीर आहे. वडील बबलू यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी 7 वाजता त्यांचा एकुलता एक 4 वर्षांचा मुलगा गोल्डी उर्फ बिट्टू घराबाहेर खेळत होता. खेळत असताना तो अचानक गायब झाला.
बाबो! तब्बल १० कोटींचा म्हैस रेडा, ‘ही’ आहेत त्याची वैशिष्ट्ये
बिट्टू गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान काही वेळात बबलूसोबत काम करणारा बंटी त्यांच्या घरी पोहचला. बंटी हा नागला रामबल येथील रहिवासी आहे. शनिवारी रात्री 11 वाजेपर्यंत बंटीही त्यांच्यासोबत बिट्टूला शोधत होता.
नंतर माहिती मिळाली की, मुल कालिंदी विहार येथील पेठा शहरात आहे. तिथे पाहिलं तर मुलाचा मृतदेह पडला होता. तसेच गोल्डीच्या छातीत गोळी लागली होती आणि त्याच्याजवळ एक पिस्तूलही पडून होते.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला असून, पिस्तूल देखील ताब्यात घेतले आहे. महत्वाची बाब म्हणजे संशयाच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावरून बंटीला पकडले. दरम्यान पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची बाब मान्य केली. दरम्यान यावेळी इतमाद-उद-दौला पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विनोद कुमार यांनी बंटीला संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.
चक्क इंजिनीअरची नोकरी सोडून पाळल्या गायी,आता महिन्याला कमवतोय लाखो रुपये; वाचा सविस्तर