“शरद पवार यांना फडणवीसांची भीती वाटत होती”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठं वक्तव्य

"Sharad Pawar was afraid of Fadnavis", Chandrasekhar Bawankule's big statement

सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर पहाटेचा शपथविधी सतत चर्चेत आहे. त्यांनतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक वक्तव्य केलं आहे.

पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत, फडणवीसांनी शरद पवारांना दिलं आणखी एक आव्हान, म्हणाले…

शरद पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनता आलं, पवारांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी जोरदार टीका केली आहे.

सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत…; उर्फीने सांगितला ‘तो’ किस्सा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती. कारण २०१४-१९ या काळामध्ये फडणवीसांनी खूप चांगल्या प्रकारे काम केली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील १५ वर्षे सत्तेत येता येणार नाही, याची भीती शरद पवारांना वाटत होती, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अदानी समूहाला तिसरा मोठा धक्का; ‘या’ बड्या कंपनीने केला करार रद्द!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *