
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पक्षातील कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मित्र पक्ष ठाकरे गटाने ‘सामना’ मधील अग्रलेखातून गंभीर आरोप केले आहेत. ( Thackeray Group) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वारस तयार करण्यात शरद पवार अपयशी ठरले असा आरोप यामधून करण्यात आला आहे.
गाडीचा एक पार्ट बनवून सोलापूरच्या तरुणाला मिळाले १३ कोटी; टाटा कंपनीने घेतली दखल!
शरद पवार हे राजकारणातील जुन्या वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यांनी हा पक्ष चालवून टिकवला सुद्धा ! मात्र शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे न्हेणारे एकही नेतृत्व पक्षात नाही. या पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा हे सगळं काही महाराष्ट्रात असल्याने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सगळं महाराष्ट्रातच हवं आहे. शरद पवार राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राजकीय पक्षात नाव आहे. मात्र, पक्ष पुढे घेऊन जाईल असा वारसदार तयार करण्यात शरद पवार अपयशी ठरले आहेत.
सावधान! दुपारची झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; होतात ‘हे’ गंभीर आजार
अशा शब्दांत ठाकरे गटाने शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर, यावेळी अजित पवार ( Ajit Pawar) यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आलेली आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडण्याचा त्यांचा प्लॅन होता. यासाठी लोक बॅग घेऊन तयार होते. तसेच येणाऱ्या लोकांसाठी लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था पूर्ण झाली होती. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा प्लॅन कचऱ्यात गेला व त्यांची पोटदुखी वाढली. असं म्हणत नाव न घेता ठाकरे गटाने अजित पवारांना फटकारले आहे.
सिमकार्डबाबत समोर आली मोठी अपडेट! एका आयडीवर मिळणार फक्त ‘इतके’ सिमकार्ड; लवकरच येणार नवीन नियम