
नोव्हेंबर 2019 मधला ‘तो’ पहाटेचा शपथविधी! त्या शपथविधीने राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ. त्यानंतर भाजपला बसलेला धक्का आणि महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अवघा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. दरम्यान ‘तो’ पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान केले आहे. 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार अवघ्या 72 तासांत कोसळले. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कधीच स्पष्ट वक्तव्य केले नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यावर आता स्पष्ट बोलले आहेत. यांनतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र या शपथविधीवर सुरवातीला शरद पवार काहीच बोलले नाहीत.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ मार्गावर मिळणार टोलमाफी
आज शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले, “फडणवीसांचं महत्व वाढवण्याची गरज नाही”. असे भाष्य त्यांनी केलं आहे.
ब्रेकिंग! ठाकरे गटासाठी धक्कादायक बातमी; प्रकरण ७ सदस्यीय खडपीठापुढं जाणार नाही