
दिल्ली | मागच्या काही दिवसापासून देशभरात पावसाने (Rain) थैमान घातले आहे. देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. उत्तर पश्चिम भारतातील बहुतांश भागात पावसाळा सुरू आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. (Latest News)
Sharad Pawar । ‘शरद पवार सैतान, या सैतानाला पाप फेडावे लागत आहे’, ‘या’ बड्या नेत्याची जहरी टीका
हवामान विभागाने (Department of Meteorology) सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र पावसाची परिस्थिती पाहता अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारने सोमवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “दिल्लीत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन उद्या दिल्लीतील सर्व शाळा एक दिवसासाठी बंद ठेवल्या जात आहेत.” असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. (School closed on Monday)
असं काय घडलं की पुण्यात टोमॅटोवरुन भाजी विक्रेता आणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
राजधानी दिल्लीतील सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी दिल्लीच्या एलजीशी संवाद साधला. शाह यांनी दिल्लीतील परिस्थितीचा तसेच जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीचा एलजीकडून आढावा घेतला. अमरनाथ यात्रेबाबत शाह यांनी काश्मीरच्या एलजीशीही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील अनेक भागात मुसळधार पाऊस
दिल्लीत अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक उद्याने, अंडरपास, बाजारपेठा आणि अगदी रुग्णालयाच्या परिसरातही पाणी साचले आहे आणि रस्तेही जाम झाले आहे. रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून वावरतानाचे लोकांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.