
Satara News । सध्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाई तालुक्यातील ओझर्डी गावात धोम धरणाचा कालवा फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पूर्ण गावांमध्ये पाणी शिरल्याची देखील माहिती मिळाली आहे. ओझर्डी गावात धोम धरणाचा कालवा फुटल्या नंतर संपूर्ण गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. यानंतर जवळपास 150 ऊसतोड मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. (Satara Breaking News)
ऊसतोड मजुरांना या मधून बाहेर काढण्यात आले असले तरी त्यांच्या संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा कालवा फुटला आहे. यामुळे नदी नाल्यांना पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे.
या घटनेनंतर रातोरात जवळपास 150 ऊसतोड मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र मजुरांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यांच्या संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर २ बैल पुरामध्ये वाहून गेले असून १२ बैलांना वाचवण्यात यश आले आहे.