
Sambhajinagar News । बालविवाहवर बंदी (Ban on child marriage) आली असली तरी अजूनही बालविवाह होण्याचे प्रकार घडतच आहेत. सध्या छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या दामिनी पथकाला बालविवाह रोखण्यास यश मिळाले आहे. बालविवाह बाबत माहिती मिळाल्यावर या पथकाने अनोखी शक्कल लढवून स्वतः पाहुणे म्हणून लग्नाच्या मंडपात तब्बल एक तास बसून होते. यानंतर वधू वर लग्न मंडपात येताच पोलिसांनी खात्री केली आणि बालविवाह होण्यापासून रोखला. त्याचबरोबर दोन्ही कुटुंबाचे पोलिसांनी समुपदेशन करून समज देखील दिली. (Damini Squad of Chhatrapati Sambhajinagar Police)
PAK vs PM-11 । पाकिस्तानसाठी अपशब्द वापरल्याने गोंधळ, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला माफी मागावी लागली
हा बालविवाह रोखताच मुलीच्या आईची चौकशी करण्यात आली. यावेळी मुलीच्या आईने दामिनी पथकाला सांगितले की, मॅडम मी धुनी भांडी करते . मला दोन मुली आहेत आज जमाना खूप वाईट आहे. त्यामुळे मला माझ्या डोक्यावरचे ओझे कमी करायचे आहे. चांगली सोयरीक जुळून आल्यामुळे मी मुलीचे लग्न लावत होते. असे हात जोडून सांगितले मात्र कायद्यानुसार हा गुन्हा आहे असं समजावून सांगत पोलिसांनी सर्वांचे समुपदेशन केले आणि हा बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आले.
हा बालविवाह कन्नड तालुक्यातील नवरदेव आणि पडेगावातील साईनगर तथागत चौक परिसरातील नवरी यांचा होता. याची माहिती दामिनी पथकाला मिळाली त्यानंतर दामिनी पथकाने साध्या वेशभुषेत लग्न मंडपात प्रवेश केला. तब्बल एक तास हे पथक लग्न मंडपात बसून राहिले त्यानंतर नवरी आणि नवरदेव मंडपात आले. यानंतर त्यांनी हा बालविवाह असल्याची खात्री केली आणि त्यांना बालविवाह रोखण्यात यश आले.