
T20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2022 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असून या मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर 10 विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाची या पराभवामुळे टी 20 वर्ल्ड कप विजेतेपदाची 15 वर्षापासूनची प्रतिक्षा संपलेली नाही. 2007 सालापासून भारताला टी-20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवता आलेलं नाही.
दिव्यांगांसाठी होणार स्वतंत्र मंत्रालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय
या पराभवांनंतर चाहते खूप नाराज झाले आहेत. फक्त चाहतेच नाही तर रोहित शर्मा देखील नाराज झाला आहे. या संपूर्ण मॅचमध्ये रोहित शर्माची बॅट विशेष चालली नाही. यावेळी रोहित रडत होता त्यावेळी, तिथे बाजूला भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बसले होते. रोहित रडत असताना त्यांनी त्याच्या पाठीवरुन हात फिरवून त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला.
सावधान! लॉटरीचे आमिष दाखवून होतेय फसवणूक; महिलेचे 50 हजारांचे नुकसान
या पराभवांनंतर रोहित शर्मा म्हणाला की, “ मी खूप निराश आहे आम्हाला चांगली गोलंदाजी करता आली नाही. नॉकआऊटच (Knockout) प्रेशर तुम्ही कसं संभाळता, त्यावर सर्व काही अवलंबून असतं. आम्ही सुरुवातीलाच घाबरत होतो. व इंग्लंडच्या (England) ओपनर्सना श्रेय द्याव लागेल”.
IND vs ENG: पराभवानंतर रोहित शर्माला कोसळले रडू; पाहा व्हिडीओ