Site icon e लोकहित | Marathi News

Ritesh Deshmukh: आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रितेश देशमुखने केले कौतुक

Riteish Deshmukh hails India's resounding victory over Pakistan in Asia Cup

मुंबई : काल आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान सामना भारताने पाच गडी राखून जिंकला.पाकिस्तानने विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य भारताने पाच गडी राखून गाठले. या सामन्यात भारताला शेवटच्या तीन चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.भारताच्या या विजयाने सगळीकडेच आनंद गगनात मावला नाही. आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर भारतीय संघाचे कौतुक करत पोस्ट शेअर केल्या आहेत.यासह अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh), कार्तिक आर्यन आणि अर्जुन रामपाल या तिघांनीही भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे.

Amol Mitkari: शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार – अमोल मिटकरी

काय म्हणाला अभिनेता रितेश देशमुख

कालच्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात भारत विजयी झाला.यावेळी रितेश देशमुखने ट्वीट केले आहे. “हार्दिक पंड्या तुझे फार कौतुक. सामना छान रंगला आणि आपण विजयी ठरलो. खूपच छान. भारतीय संघाचे अभिनंदन. त्यासोबत पाकिस्तानचा संघही चांगला खेळला”.तसेच ट्वीट सोबत रितेश देशमुखने #INDvsPAK या हॅशटॅगचाही वापर केला आहे.

Nilesh Lanke: “…..त्याच्याचमागे देखील ईडी लागत आहे”, आमदार निलेश लंकेंचा भाजपवर घणाघात

अभिनेता कार्तिक आर्यन शुभेच्छा देताना काय म्हणाला

अभिनेता कार्तिक आर्यने इन्स्टाग्रामवर कालच्या भारताच्या विजयाचे कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर करत व्हिडीओच्या मागे भुलभुलेय्या २ या चित्रपटातील गाणेही पाहायला मिळत आहे. तसेच याला भारत-पाकिस्तान सामन्यात भारत जिंकावा अशी प्रार्थना मी दिवस रात्र करत असतो. अशी कॅप्शन दिली त्यासोबत त्याने #HardikRoohBaba असा हॅशटॅग शेअर करत हार्दिक पांड्याचे कौतुक देखील केले आहे.

Spread the love
Exit mobile version